प्रियदर्शी अशोक ...
तुला काय बोलू....आणि तुझ्याबद्दल किती बोलू...
तुला जनतेने प्राणप्रिय म्हणून दिलेल्या पदव्या वाचताना....
धाप लागते मला...जशी बुद्धाची हजारो नाव ...आणि बाबासाहेबांच्या पदव्या वाचताना लागते ...तशी...!
तू ...होय...तूच...
तुझ्या नावापुढे ...पोकळ आदरार्थी अनेकवचने लावून ...
तुझं माझं नातं मला परकं करावंसं अजिबात वाटत नाही बघ...
मी सह्याद्रीच्या कठीण कातळांना रानवारा पिऊन ....
भेटत असतो....तेंव्हा माझ्या खांद्यावर हात टाकून तूच माझ्याबरोबर चढत असतोस....पायवाटा मानवमुक्तीच्या...
तू कोरलेल्या हजारो लेण्या साक्ष देत राहतात.. तुझ्या कारुण्यमूर्ती व्यक्तीमत्त्वाची... आणि विशाल हृदयी काळजाची...
खरंतर या विश्वाचा सात बारा तुझ्या नावाचा आहे...
तुला 'महान' या आदरार्थी संबोधना शिवाय...संबोधनच सुचत नाही बघ
तुझ्याच परंपरेला पुढे... सातवाहन राजांनी पुढे नेलं...
आणि नंतर तोच वारसा...बोधिसत्व बाबासाहेबानी...
हे प्रियदर्शी सम्राटा... विश्वविजेत्या...
जेंव्हा जेंव्हा मी स्वतःच्या सावलीला बघून हतबल होऊन जातो...आणि या विश्वात माझी किंमत किड्या मुंगीची आहे याची जाणीव मला होत जाते...जेंव्हा जेंव्हा माझं मन पार गांगरून जातं..
तेंव्हा तेंव्हा...तुझ्याकडे पाहिलं की वाटत राहतं...
आपण कोण्या येरागबाळ्याचे वारस नाही आहोत...
तो वारसा व्हाया बाबासाहेब आजही...मेंदूच्या नसा नसांमधून वावरतोय... मग नैराश्याच्या विचारांना अलगद धोबी पछाड देऊन आस्मान दाखवतो मी... कारण तुझ्या नावातच अ-शोक आहे.तुझी तुलना फक्त तुझ्याशीच होऊ शकते...
अन्य कुणाशीच नाही...
तुला तुझ्या जन्मदिनाच्या....कोटी कोटी शुभेच्छा...
©प्रा.सागर कांबळे करवीर
No comments:
Post a Comment